Posts

🌹🌹मनभावन गीत, गाणे अन् कविता🌹🌹

Image
             धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ होऊन समाजात आज जी काही गढुळता आली आहे, तीचे स्पष्ट चित्र प्रतिबिंबीत करणारी ही कविता दृष्टे कविवर्य विठ्ठल वाघ यांनी शब्दबद्द केलेली आहे. ही कविता संवेदशील वाचकाला अंतर्मुख करेल……... 🌹मारिच🌹 आकाशातून पुरता खाली उतरलोही नव्हतो तोच कुण्या मंदिराच्या कळसाचा रुतला पायात काटा अजुन उठलेही नव्हते ओठांवर शब्दांचे तरंग तोच चर्चेसच्या घंटांनी उठविल्या कानात लाटा. अजुन उघडलेही नव्हते पापण्यांचे बंद दरवाजे तोच डोळ्यांच्या देव्हाऱ्यात एक ईश्वर बसविला गेला संस्काराचे ढग पांगल्यावर प्रकाशला आत्म्याचा सूर्य तेव्हा कळले देवाच्या नावावर एक असुर बसविला गेला. मला असे सांगण्यात आले, धर्मकुंडात अमृताचे थेंब असतात बायबल कुराणच्या मातीत कल्पवृक्षाचे कोंब असतात तेव्हा माझे पाय राम होऊन त्या मारीचामागे धावत राहिले कळले नाही तेव्हा मंदिरमशीदीपासून रावण फार लांब नसतात रावण फार लांब नसतात.                                           ...

🌹🌹चला कोकणात 🌹🌹

Image
                       निसर्गसुंदर कोकण नेमके कसे आहे ? अशी विचारणा मध्यप्रदेशात राहणाऱ्या एका मित्राने एकदा मला केली होती. कोकणातील सुंदरतेचे वर्णन त्याला ऐकवले. तो कोकणात यायला निघाला. ‘ आमचे कोकण दोन दिवसांत पाहून होणार नाही, त्यासाठी निवांत वेळ काढून कोकणांत यावे लागते’, अशी स्पष्ट कल्पना त्याला मी दिली. ‘कोकणात मी येणारच’ असे त्याने पक्के ठरवले.                       प्रारंभी सिंधूदुर्ग जिल्ह्यातील काही महत्वाची ठिकाणे दाखविण्याचे नियोजन करून मी या मित्राला कोकणात यायचे निमंत्रण दिले. दोघेही भटक-भ्रमंती करणारे असल्यामुळे कोणतेही खासगी वाहन न घेता सार्वजनिक वाहनांची मदत घेत चालत-फिरत मनसोक्त भटकण्याचा आम्ही आनंद लुटला.                       हा आनंद तुम्हीही घ्यावा म्हणुन दोन छोट्या कोकण सफरींचा वृत्तांत येथे देत आहे……….. 🌹लपलेले सौंदर्य : निवती🌹             ...

🌹🌹सुविचार-काव्यकण🌹🌹

Image
                            जगभरात मान्यता पावलेले थोर आणि कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्व, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा विनम्र मुजरा……   (शिव छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी तारखे प्रमाणे ३ एप्रिल १६८०- शालिवाहन शके १६०२ चैत्र शुध्द पौर्णिमा)                        💐💐💐💐💐💐💐💐💐💐

🌹🌹चित्रपट गप्पा🌹🌹

Image
              वर्षभरात पाहिलेल्या व दखल पात्र अशा तीन लघुपट-माहितीपटांचा अल्प परिचय मी इथे देत आहे. दोन समाजातील औपचारिक संबंध व मानवी संवेदना यांचे चित्रण करणारा ‘तिचं शहर होणं’ हा लघुपट, महाराष्ट्रातल्या लाखो कापड गिरणी कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या ऐतेहासिक गिरणी कामगार संपाची आठवण जागविणारा 'आणखी एक मोहिंजोदाडो...' हा माहितीपट आणि स्वातंत्र्यपूर्व काळात तळमळीने कार्य केलेल्या राष्ट्रप्रेमी नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे कर्तुत्व दाखवत आजचे वास्तव टिपणारा ‘वसुधैवकुटुंबकम’ हा माहितीपट,…… 🌹तीन विशेष चित्रपट🌹 *आणखी एक मोहिंजोदाडो...*                     जाणते चित्रपट अभ्यासक अशोक राणे यांच्यासह राजेश पेडणेकर व नितीन साळुंखे यांच्या संपूर्ण टीमने परिश्रम घेऊन सादर केलेल्या या माहितीपटाने गिरणी कामगार आणि गिरणगावाचे त्यावेळचे चित्र पुर्णतः डोळ्यासमोर उभे राहते.                    यातील दृश्ये, संवाद तसेच आपल्या पुढे येणारे छोटे मोठे कलावंत, नेते, समाजस...

🌹🌹समाजसंवेदना🌹🌹

Image
                संवेदनशील माणसं आणि समाजभान ठेवून सत्कार्य करणाऱ्या संस्था ज्या गावात, शहरात, राज्यात अन् देशात आहेत त्या गावाची, राज्याची आणि देशाची कधीच अधोगती होणार नाही. अवती भवती दिसणारी सध्याची नकारात्मक परिस्थिती पाहून देखील मी आशावादी आहे, कारण हीच माणसं आणि संस्था सभोवतालच्या अधोगतीला रोखत आहेत.                 रोज सकाळी वर्तमानपत्रात येणाऱ्या राजकारणाची लक्तरं वेशीवर टांगणाऱ्या बातम्या आता वाचाव्याशा वाटत नाहीत. सोशल मीडियावर सातत्याने येणाऱ्या नेत्या-पक्षाचे ' कार्यकर्तुत्व ' बघवत नाही. अशा काळात कोणा समाजसेवी व्यक्ती-संस्थेला पुरस्कार दिल्याचे वृत्त पहायला मिळाले की मला खुप आनंद होतो व अभिमान वाटतो. यासाठी मी इथे मुंबईतील राजहंस प्रतिष्ठान या संस्थेने केलेल्या गौरव सोहळ्याचे उदाहरण देत आहे……….. 🌹 देणे राजहंसाचे 🌹                 मुंबईतल्या पश्चिम उपनगरात गोरेगांव येथे गेली आठ वर्षे कार्यरत असलेले राजहंस प्रतिष्ठान ही प्रामुख्याने रुग्णसेवा करणारी सेवा...

🌹🌹सुविचार काव्य कण🌹🌹

Image
              “ समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजावण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.”                                                        पु. ल. देशपांडे.                                                              

🌹🌹वाचन छंद🌹🌹

Image
                  हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ठ गीत लेखन करणारे जुन्या जमान्यातील जाणते कवी साहिर लुधियानवी गान रसिकांना अधिक परिचीत व्हावेत, या हेतूने अक्षय मनवानी या मान्यवर लेखकाने लिहिलेल्या आणि मिलिंद चंपानेरकर या चिकिस्तक लेखकाने अनुवादित केलेल्या ‘लोककवी साहिर लुधियानवी’ या पुस्तकाचा अल्प परिचय मी येथे करून देत आहे……… 🌹 लोककवी साहिर लुधियानवी 🌹 लेखक - अक्षय मनवानी, मराठी अनुवाद - मिलिंद चंपानेरकर, प्रकाशक – रोहन प्रकाशन.                   हे मुळ पुस्तक लेखकाने इंग्रजी भाषेत लिहिलेले असुन त्याचे शिर्षक आहे. – The People’s Poet  Sahir Ludhiyanvi . ‘अभी न जावो छोडकर(हम दोनो), चलो इक बार फिरसे(गुमराह), संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे- (चित्रलेखा)…….’ अशी चित्रपट रसिकांच्या काना-मनात सदैव गुंजत राहणारी कित्येक हिंदी गाणी लिहिणाऱ्या कवी व गीतकार साहिर लुधियानवी त्यांच्या काव्य-साहित्याचा सखोल आढावा घेताना त्यांचे व्यक्तिमत्त्व, सभोवतालची सामाजिक परिस्थिती व त्यांनी आयुष...