🌹🌹मनभावन गीत, गाणे अन् कविता🌹🌹
धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ होऊन समाजात आज जी काही गढुळता आली आहे, तीचे स्पष्ट चित्र प्रतिबिंबीत करणारी ही कविता दृष्टे कविवर्य विठ्ठल वाघ यांनी शब्दबद्द केलेली आहे. ही कविता संवेदशील वाचकाला अंतर्मुख करेल……... 🌹मारिच🌹 आकाशातून पुरता खाली उतरलोही नव्हतो तोच कुण्या मंदिराच्या कळसाचा रुतला पायात काटा अजुन उठलेही नव्हते ओठांवर शब्दांचे तरंग तोच चर्चेसच्या घंटांनी उठविल्या कानात लाटा. अजुन उघडलेही नव्हते पापण्यांचे बंद दरवाजे तोच डोळ्यांच्या देव्हाऱ्यात एक ईश्वर बसविला गेला संस्काराचे ढग पांगल्यावर प्रकाशला आत्म्याचा सूर्य तेव्हा कळले देवाच्या नावावर एक असुर बसविला गेला. मला असे सांगण्यात आले, धर्मकुंडात अमृताचे थेंब असतात बायबल कुराणच्या मातीत कल्पवृक्षाचे कोंब असतात तेव्हा माझे पाय राम होऊन त्या मारीचामागे धावत राहिले कळले नाही तेव्हा मंदिरमशीदीपासून रावण फार लांब नसतात रावण फार लांब नसतात. ...