Posts

Showing posts from November, 2019

💐मित्रांगण💐

Image
💐मित्रांगण💐         कॉलेजला असताना एक विषय होता मानस शास्त्राचा. आमच्या प्राध्यापक सरांनी सांगितलेले त्यावेळचे एक वाक्य माझ्या चांगले लक्षात राहिलेय. ‘ Man is a social animal ‘.  म्हणजे मानवप्राणी हा संवेदनशील असून तो समाजप्रिय आहे.                  हाच विचार घेऊन मी माझ्या परिवारा बाहेर, समाजात मिसळत राहिलो. वावरत राहिलोय. त्यामुळे काही नवीन परिचय झालेत. त्यातले काही परिचय मैत्रीत रूपांतरित झाले. काहींशी दाट मैत्री झाली, तर काही वरवरचे मित्रही झाले ! माझे मित्रांगण तयार झालेय ते असे !                     या  मित्रांगणात हळूहळू भर पडू लागली. मित्रांच्या गप्पाटप्पात आणि फिरण्या-वावरण्यात मोठी धमाल होऊ लागली.                 खरे तर, पूर्वी शालेय जीवनात मित्र परिवार होता. पण मैत्री हा विषय तेव्हा नीट उमजला नव्हता. एवढे परिपकव मन नव्हते.  आता तरी आपण कुठे परिपकव झालेलो आहोत एव्हढे ? मात्र सर्वसाधारण निरीक्षणातून सांग...

💐सुंदर माझे घर💐

Image
💐सुंदर माझे घर💐      आपले घर सुंदर असावे असे कुणास वाटत नाही ? आपल्या घरात हसरे तारे हवेत, एकमेकांबद्दल जिव्हाळा हवा, सुखदुःखात एकमेकांना साथ हवी, अशी ‘सुंदर’ घराबद्दलची माझी साधी-सरळ व्याख्या आहे. चार भक्कम भिंती, आत बाहेर चकाचक रंग, आलिशान फर्निचर, दिवसरात्र टिव्हीत किंवा मोबाईल-नेटच्या सानिध्यात मग्न असणारी, सतत उत्सवी कपड्यात नटून थटून घरात वावरणारी माणसे ज्या घरात आहेत, त्या घरास मी ‘सुंदर घर’ म्हणणार नाही.        आपले सुंदर घर खऱ्या अर्थाने ‘सुंदर’ व्हावे, याकरीता परिवारातील प्रत्येक जाणती व्यक्ती सदैव धडपड करीत असते. ती त्यांची जबाबदारीही आहे. आपला परिवार आर्थिकदृष्ट्या स्थिर, म्हणजे भक्कम राहील, हे प्रथमतः कुटुंबप्रमुखाने ठरवायचे असते. मात्र तो दूरदृष्टीने विचार करणारा हवा. आपल्या घरात आर्थिक स्थिरता कशी येईल आणि टिकेल, वाढेल याविषयी तो दक्ष राहून कृती करणारा हवा.       म्हणून मी हे विचारपुष्प घराला ‘आर्थिक स्थिरता’ यावी व सामान्यांनी सजग व्हावे याकरीता लिहीले आहे.                 ...

💐मनातलं जनात💐

Image
💐मनातलं जनात💐             या जगात, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात या ना त्या कारणाने, पोलीसांशी आणि कोर्टाशी एकदा तरी संबंध येतो. समाजात कायदा तसेच शांतता अखंडित ठेवण्याची मोठी जबाबदारी पार पाडणारे पोलीस खाते आणि जनतेला विश्वासाने न्याय देऊन अपराध्याला शिक्षा देणारे कोर्ट, या दोन प्रभावी यंत्रणा समाजजीवनात अत्यावश्यक आहेत.                 मात्र आज, पोलीस म्हटले की सामान्य माणसाच्या मनात कारण नसताना धडकी बसते ! आणि कुठल्याही कारणासाठी कोर्टाची पायरी चढायची वेळ आली,  तरी त्याचे ब्लड प्रेशर वाढू लागते !                 वास्तविक असे व्हायला नकोय.  मला आयुष्यात दोन्ही ठिकाणी या पायऱ्या चढाव्या लागल्या. त्यामुळे पोलीस आणि कोर्ट मला थोडेफार उमगलेय. काही  भलबुरे अनुभवही गाठीशी आलेत. मात्र आजही मी या दोन्ही यंत्रणांना आदरस्थानी मानतो व त्यांच्याबद्दल विश्वास बाळगून आहे.                 पोलीस स्टेशनची पायरी चढल्यानंतर वेळोवेळी कोण...