Posts

Showing posts from October, 2019

💐समाज संवेदना💐

Image
💐समाज संवेदना💐             प्रत्येक माणसाला  व प्राणीमात्राला जगायला काय लागते ? तर, पाणी. हे पाणी आपले जीवन आहे, असे लहानपणापासून मी ऐकत आलोय. मात्र हेच पाणी सर्वदूर नेण्यासाठी मूळ नदीकाठच्या व खोऱ्यात विस्थापित होत असलेल्या स्थानिक निवासी-आदिवासी बांधवांच्या कायमस्वरूपी सुरक्षित पुनर्वसनाचे काय ?                  या प्रश्नाकडे माझे लक्ष वेधले गेले  ते एका माहितीपटामुळे.  शिल्पा   बल्लाळ या तरुणीने प्रत्यक्ष पाहिलेलं व अनुभवलेलं  संकटग्रस्तांचे वास्तव चित्रण आणि पुढच्या पिढीसाठी सुरु असलेल्या शैक्षणिक सत्कार्याची ओळख  या माहितीपटात आहे.  शिल्पा ही   सामाजिक विषयांची चांगली जाण असणारी व कृतिशील कार्यकर्ती आहे. नर्मदा सरोवर प्रकल्पग्रस्त आंदोलकांचा निकराचा लढा या महिला दिग्दर्शिकेने यात दाखविला असून तो पाहणाऱ्याला अस्वस्थ व अंतर्मुख करतो.                        समाजमनात घर करून राहाण्याची व प्रसंगी समाजाला वास...

💐वाचन छंद💐

Image
💐वाचन छंद💐                   वाचनप्रेमींनो, सस्नेह नमस्कार,                 मला नुकतीच, दोन चांगल्या आणि मोठया लायब्ररीजना भेट द्यायची संधी योगायोगाने मिळाली. त्या विषयी मी येथे वाचन-संवाद करीत आहे……………… 💐सेन्ट्रल लायब्ररी---गोवा आणि सुरत…………..                           आर्किटेक्टचे शिक्षण घेणाऱ्या माझ्या मुलीने यंदा डिग्री वर्षात एक प्रोजेक्ट, केस स्टडीसाठी घेतला आहे. सर्व सखोल अभ्यास करून हा प्रोजेक्ट सादर करावा लागतो. त्याची तपासणी होऊन गुणांकन केले जाते. प्रत्येक विध्यार्थी त्याकरीता एक विषय निवडतो. हिने निवडलेला विषय आहे, ‘पब्लिक लायब्ररी’.  काही निवडक लायब्ररीजना प्रत्यक्ष भेट देऊन हा प्रोजेक्ट तयार करावा लागतो.               तीने निवडलेल्या दोन लायब्ररीज महाराष्ट्राबाहेर होत्या. ती एकटीच असल्याने सोबतीला मला तिकडे जाणे आवश्यक होते. या दोन लायब्ररीत मी एक ‘वाचक’ म्हणून फेरफटका मारल...

💐भटकंती मनसोक्त💐

Image
💐भटकंती मनसोक्त💐                                      भटकंतीची आवड अन शिर्डीला दरवर्षी जाणाऱ्या साईंच्या पालख्यांचे मला कुतूहल होते. तेव्हा दादरमधून मुंबईतील एकमेव मोठी पालखी निघायची. ही माहिती मिळाल्यानंतर मी त्या पालखी यात्रेत सामील व्हायचे ठरवले. लालबाग आणि ग्रँटरोड भागातील जुने साईभक्त एकत्र येऊन मंडळाच्या माध्यमातून नेमाने दरवर्षी हा कार्यक्रम आखायचे. त्यांचे पालखीचे नियोजन शिस्तबद्ध आणि चांगले होते. प्रत्येक सहभागीची माहितीसह नोंद, निघण्याची तारीख, शिर्डीत  पोहोचण्याची तारीख, पहाटेपासून ते रात्री विश्रांती समयी पर्यंतचा दिनक्रम, रोड-हायवेवरून चालताना सुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाची दक्षता, ठरलेली आरतीची वेळ, दुपार-रात्रीची मुक्काम स्थळे, आरोग्य व प्रथमोपचार सोयी, खानपानाची तसेच स्वछतागृहांची व्यवस्था, इत्यादी सर्व बाबतीत मंडळाचे आयोजक दक्ष होते. मी या पालखी यात्रेत सहभागी होऊन पूर्णतः शिर्डीपर्यंत चालायचा आगळा अनुभव घेतलाय.                ...