Posts

Showing posts from March, 2024

💐💐निसर्गायण💐💐

Image
                 निसर्ग अन् आपलं आयुष्य यांचं एकमेकाशी नातं असतं. हे नातं जेवढं गहिरं होत जातं, तेवढी जगण्याची गोडी वाढत राहते. याची चांगली अनुभूती मला वेळोवेळी मिळालीय. फिरण्या भटकण्याच्या नादापायी निसर्गाचे सानिध्य मला मिळते आहे. निसर्गाची वेगवेगळी रूपं आणि गुणवैशिष्ट्ये न्याहाळताना माझे मन नेहेमी प्रफुल्लित होत असते. सकाळ उजाडते, तेव्हा सवयीने मला जाग येते. मग भरभर सारे आवरून माझी पावले घराबाहेर पडतात.                 सकाळच्या शांत समयी निर्मनुष्य रत्यावरून सफर करीत, दूरवरची डोंगररांग न्याहाळत मी संकुलातील उद्यानात प्रवेश करतो……….. 💐मॉर्निंग वॉक💐        आपण रोज सकाळी उठतो. अगदी फ्रेश वाटण्याची ही वेळ, कारण रात्रीच्या विश्रांतीनंतर बहुतेकजण अगदी ताजेतवाने होतात. मात्र याला काही अपवाद आहेत. काहींना सकाळी लवकर उठायचा कंटाळा येतो ! काहीजण रात्री उशिरापर्यंत मोबाईलशी खेळत जागरण करतात, काहींना नोकरी धंद्यासाठी सकाळीच पळापळ करावी लागते ! मात्र मनात आणले तर या सगळ्यातून आपण थोडा वेळ ...

💐💐भटकंती मनसोक्त💐💐

Image
           या आगळ्या भटकंतीमध्ये जलप्रवासात आमच्यावर आलेले जीवघेणे संकट व मुक्कामी भेटलेल्या एका मनस्वी अवलियाकडून अवगत झालेले ज्ञान-प्रबोधन, हे सारेच संस्मरणीय आहे……… 💐सागरगड-सिद्धेश्वरची अध्यात्मिक सफर💐           या सफरीवर आम्ही चौघेजण होतो. मुंबईतील भाऊच्या धक्क्यावरून लॉन्चने रेवस व पूढे बस किंवा टमटम रिक्षा पकडून पुढचा प्रवास करायचा होता.                सागरगडला जाण्यासाठी अलिबागच्या अलीकडे असलेल्या खंडाळा गावी उतरावे लागते. तेथून चढणीच्या वाटेवर सिध्देश्वर आश्रम आहे.                भाऊच्या धक्क्यावर आम्ही पोहोचलो तेव्हा कळले की काही आकस्मिक कारणाने रेवसला जाणारी लॉन्च सेवा तात्पुरती बंद झालीय ! त्यामुळे मोठी पंचाईत झाली. तेव्हा आम्ही पनवेलमार्गे अलिबागला जायचे ठरवले. एवढ्यात एका स्थानिक माणसाने माहिती दिली की येथुन मोरा धक्क्यावर जाण्यासाठी लॉन्च सेवा सुरु आहे. मोऱ्याहून उरणला रिक्षाने जाता येते. तेथून करंजामार्गे छोटया पडावातून रेवसही गाठता य...

💐💐मनभावन गीत, गाणे अन् कविता💐💐

Image
         अर्धसत्य हा हिंदी सिनेमा आठवतो तुम्हाला ? गोविंद निहलानी दिग्दर्शित हा सिनेमा तेव्हा गाजला होता . गुन्हेगारी जग , प्रामाणिक अधिकारीआणि सामान्य माणूस यांचे वास्तव चित्रित करणाऱ्या या सिनेमात ओम पुरी , अमरीश पुरी , सदाशिव अमरापूरकर , स्मिता पाटील , नसीरुद्दीन शाह , शफी इनामदार , अशा दिग्गज कलावंतांनी भुमिका केलेल्या आहेत .         ‘ अर्धसत्य ’ मध्ये एक प्रदीर्घ कविता आहे . नायकाचे अस्वस्थ मन दर्शविणारी करणारी ही कविता मराठीतील प्रतिथयश कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी लिहिलीय . तीन भागातली ही कविता वाचून तुम्हीही अस्वस्थ व्हाल ………   💐 अर्ध सत्य 💐 १ -- व्यूहात शिरण्यापूर्वी मी कोण आणि कसा होतो हे आज मला आठवणारच नाही .   व्यूहात शिरल्यानंतर मी आणि व्यूह यात फक्त होती जीवघेणी जवळीक हे मला कळणारच नाही .   व्यूहाबाहेर पडल्यावर मी मोकळा झालो तरी व्यूहाच्या रचनेत फरक पडणारच नाही ...