Posts

Showing posts from February, 2018

🌹तारीख पे तारीख.....🌹

             💐कथाघर............💐             या कथाघरात प्रवेश करताना प्र. के.अत्रे या प्रसिद्द लेखक,पत्रकार,नाटककारांचे स्मरण   होतेय.             अत्रे माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक आहेत.कॉलेजात असताना त्यांच्या क-हेेचं पाणी या गाजलेल्या आत्मचरित्राने भारून टाकले होते. आयुष्यातल्यातल्या उलाढालीवर त्यांचेच 'मी कसा झालो', हे सुद्दा एक वेधक पुस्तक आहे.त्यांची कितीतरी नाटकं अजूनही रंगभूमी गाजवताहेत. कथासंग्रह देखील वाचकप्रिय आहेत.सानेगुरुजींच्या आयुष्यावर चित्रित झालेला ' श्यामची आई 'हा चित्रपट तर राष्ट्रीय पारितोषिक विजेते ठरला.              त्यांची ' चांगुणा 'कादंबरी प्रसिद्द आहे.ती सत्यावर आधारित आहे.प्रतिकुल परिस्थितीशी सामना देणाऱ्या यशोदेची कथा वाचकाला अंतर्मुख करते.              त्या पुस्तकाच्या प्रारंभी अत्रे म्हणतात '.....आजकालचे  आम्ही लेखक स्वतःला वास्तववादी म्हणवतो खरे,पण जीवनातली खरीखुरी वास्तवता च...

💐भटकंती मनसोक्त........💐

                         💐 वाय. झेड.......💐          या नावाची एक मान्यवर गिर्यारोहण संस्था मुंबईत कार्यरत आहे.'वाय झेड' म्हणजे यंग झिंगारो ट्रेकर्स.          वाय झेडचे ऐतिहासिक कार्य म्हणजे शिव स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले रायगडावरील गडजगरण सोहळा.हा कार्यक्रम राज्यभर गाजला.दूरदर्शनवर सुद्धा त्याचे प्रेक्षपण झाले होते.           १९८५ मध्ये झालेल्या या गडजागरणाचे कौतुक दुर्गमहर्षी अन लेखक स्वर्गीय गो.नि.दांडेकर. तसेच साबिर शेख.शिल्पकार अण्णा सहस्रबुद्धे या मान्यवरांनी केलेय.तीन दिवस ते स्वतः गडावर राहिले होते.            गिरिप्रेमी मावळ्यांचे कौतुक करताना गोविंदा भारावून गेले होते.त्यावेळी ते म्हणाले होते,'एवढी चांगली मंडळी तुम्ही,हे तुमचे काम बघून शिवप्रभूही धन्य झाले असतील.....पोरांनो मोठे काम केलेत तुम्ही....पण मला हे तुमचे 'वायझेड' हे नाव बुवा पटत नाही काही.ते बदलुन टाका बघु आधी.....'.     ...

🌹चित्रपट गप्पा......🌹

                                                              चित्रपट गप्पा......            🌹चित्रपट म्हटला कि आपल्या डोळ्यापुढे 'करमणूक' हा शब्द उभा राहतो.पण खरोखर चित्रपट हा फक्त आपली करमणूक करित असतो का?                        पूर्वी थिएटरमध्ये (आणि आता घरोघरी) आरामात दोन-तीन तास लोकं सिनेमा पाहात असत.या सिनेमांत तुम्ही- आम्ही गुंग होऊन जायचो.सिनेमा संपला की, आपण भानावर यायचो.याचे रहस्य काय बरे होते? तर,आपल्याला त्या चित्रपटाची (म्हणजेच सिनेमाची) कधी कथा भावायची, तर कधी त्यातली अवीट गोडीची गाणी आपल्या ओठांवर कायमची घर करून बसत असत.उत्तम काम करणारे कलावंत,त्यांच्या सौंदर्यासह मोहीत झालेले तुमच्या माझ्यासारखे कित्येक रसिक असतील!                        यालाच मी चित्रपटाचा आपल्या...