Posts

Showing posts from December, 2018

💐आठवणीतील व्याख्याने💐

Image
💐आठवणीतील व्याख्याने💐                      आपल्या चिरतरुण गीत आणि संगीताने रसिक श्रोत्यांना सदैव गुणगुणत ठेवायला लावणारे हसतमुख असे यशवंत देव आज आपल्यात नाहीत. सोमवार २९ नोव्हेंबर च्या मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. पण माझ्या मनात या स्वरमयी देवांचे व्याख्यान अजूनही गुंजत आहे.......... 💐गीत,शब्द, अन सुरेल चाली.........                    ' असे गाणे जन्मा येते ' हे कविवर्य आणि संगीतकार यशवंत देवांचे व्याख्यान चिंचपोकळी येथील विवेकानंद व्याख्यानमालेने आयत्यावेळी घोषित केले. त्या दिवशी होणार होते साहित्यिक अरुण साधू यांचे व्याख्यान. विषय होता- 'मराठीची गळचेपी ' .                  अर्थात, यशवंत देवांचे व्याख्यान स्मरणीय असेच झालेय.               देवांच्या चेहेऱ्यावर हास्य, पण स्वभाव मिश्किली अन  खोडकर असा ! हे त्यांच्या संवादात  जाणवले.  आपल्या बोलण्यातून केलेल्या हलक्य...

💐धार्मिक पण मार्मिक💐

Image
💐धार्मिक पण मार्मिक💐 .                   निसर्गसुंदर कोकणात दिवाळी सणानंतर गावोगावी जत्रोत्सवांचे आयोजन सुरू होते. अगदी ठाण्यापासून   बांदयापर्यंत आपल्या आराध्य आणि ग्रामदेवतांच्या जत्रा जल्लोषात होत असतात. त्यासाठी गावातल्या मानकऱ्यांसमवेत मुंबई आणि इतर शहरांतील चाकरमानी श्रद्धेने उत्सवाच्या तयारीस लागतात. कितीही प्रापंचिक विवंचना असोत की, त्यांना त्यांच्या नोकरीधंद्यातून वेळ मिळत नसला, तरीही साऱ्या अडचणी बाजूस ठेऊन ही गावकरी मंडळी उत्सवाच्या पूर्वतयारीत रंगून जातात.                   जत्रेचा दिवस जवळ येतो अन या कारभाऱ्यांची तहानभूक हरपते. हे लोक एवढी कामं तरी कोणती करत असतील !               देवळाचा परिसर साफ करणे, डागडुजी करून त्याची रंगरंगोटी करणे, देव-देवतांच्या लहान-मोठया मूर्ती व प्रतिमा व्यवस्थित घासणे, साफ करणे, त्यांची वस्त्रप्रावरणे करणे, देवांचे तरंग, पालखी,रथ, चौरंग-इत्यादी वस्तूंची नीट तपासणी करून आवश्यक असल्यास त्यांची दुरुस्ती करणे, प...

💐स्वर्गस्थ💐

Image
💐स्वर्गस्थ💐                    अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला या  सुप्रसिद्द संस्थेने मुंबईमध्ये सुवर्णमहोत्सवी अधिवेशनाचे आयोजन केले होते. तीन दिवसांच्या या स्मरणीय अधिवेशनात पूर्णकाळ, कॉलेजच्या एन.एस.एस.चा एक स्वयंसेवक म्हणुन काम करण्याची संधी मला लाभली.                    पूज्य सानेगुरुजींच्या थोर कार्याचा प्रसार सर्वदूर करण्याची प्रतिज्ञा करून ती प्रत्यक्षात  आणणाऱ्या जेष्ठ मंडळींचा परिवार खूप मोठा आहे. यात अग्रणी होते  प्रकाशभाई मोहोडीकर. आज ते हयात नाहीत. शिस्तप्रिय स्वभाव पण तेवढेच मायाळू अशा या प्रकाशभाईंच्या हाताखाली काही दिवस का होईना, काम करताना खूप शिकायला मिळालेय. त्या सुवर्णमहोत्सवी अधिवेशनातील कार्यक्रमात कितीतरी मोठ्या मंडळींनी सहभाग घेतला होता माहितेय ? स्वर्गीय बाबा आमटे, अच्युतराव पटवर्धन, कानू घोष, बाळासाहेब ठाकरे, बाळकराम वरळीकर, मधू नाशिककर,मधुकरराव चौधरी, सुशीलकुमार शिंदे...........अशी आणखीही दिग्गज मंडळी होती.         ...