Posts

Showing posts from April, 2019

💐मनातलं जनांत💐

Image
💐मनातलं जनांत💐              फोन स्वतःकडे असणं ही आता प्रत्येकाची अत्यावश्यक बाब झालेली आहे. त्यातही हा फोन आपल्या हातात सतत असावयास हवा ! नाहीतर आपण मागासलेले--अडाणी ठरतो !              हा फोनज्वर आज पुऱ्या देशभर/भारतभर पसरलाय. दररोज प्रवास करताना-लोकल ट्रेन मध्ये, दूरवरच्या प्रवासात मेल/एक्सप्रेसमध्ये, रस्त्यात, ऑफिसमध्ये, रेल्वे प्लॅटफॉर्मवर, गाडी चालविताना, अगदी टॉयलेटमध्ये सुद्दा हातातला फोन बाजूस ठेवणे अवघड जाते या फोनबहाद्दरना !              मला याविषयीच अशा फोनबहाद्दरांशी थोडं बोलायचं आहे.....   💐हातात ' फोन ' स्मार्ट ' , पण बुद्दी आहे  ' माठ ' !.........                 जवळपास ८० टक्क्यांहून अधिक मोबाईलफोन धारक अध्य यावत व महागडा फोन हाताळतात, पण त्या फोनचा ' स्मार्टनेस'  काही आत्मसात करून घेत नाहीत. या फोनमध्ये ज्ञान देणाऱ्या व तुमच्या मेंदूला चालना देणाऱ्या एवढ्या गोष्टी उपलब्ध असतात की, आपण त्या बहुगुणी ...

💐निवडणुक धमाल💐

Image
💐निवडणुक धमाल💐                       जगातील सर्वात मोठे प्रजासत्ताक म्हणून ख्याती असलेला आपला भारत देश ६८ वर्षांची वाटचाल करून पुढे पुढे जात आहे.                                        पाच वर्षांतून एकदा होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आपले अमूल्य मत देऊन लोक नियुक्त सरकार स्थापन करणारी ही लोकशाही आता प्रगल्भ झालीय, की फक्त  नामधारी लोकशाही आहे ? याचे खरे उत्तर जाणकार व जागरूक भारतीय मतदार जरूर देतील.                          मी देखील एक मतदार आहे, आणि माझ्या नजरेतून भोवतालचे राजकीय वातावरण न्याहाळताना, माझ्या मतदार राजाला चार शब्द मला सांगावेसे वाटतात, राजाने त्यावर जरूर विचार करावा...........               💐मतदार राजा जागा हो...............                   ...

💐वाचन छंद💐

Image
💐वाचन छंद💐                       अमरावतीत राहात होतो तेव्हाची गोष्ट आहे. 'लोकसत्ता'च्या नागपुर रविवार आवृत्तीमध्ये एकदा एक छान  लेख वाचनात आला. लिहिले होते सारंग दर्शने यांनी.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निकट काही काळ सहवास लाभलेल्या काहीजणांना भेटून योगीराज बागुल यांनी ' आठवणीतील बाबासाहेब '  हे पुस्तक लिहिलेय. ग्रंथालीने ते प्रकाशित केलेय.या पुस्तकाचे परिक्षण लेखात होते. त्याविषयी माझे शब्दांकन तुमच्यासाठी, बाबासाहेबांना वंदन करून-------- 💐स्वाभिमानी आणि शिस्तप्रिय बाबा.........                    योगीराज बागुल या लेखकाने बाबांच्या सहवासात राहिलेल्या काही जुन्या-जाणत्या व्यक्तींशी संवाद साधून हे पुस्तक लिहिले आहे. ' बाबा ' कडक शिस्तीचे व स्वाभिमानी असूनही आतून किती मायाळू होते, याची जाणीव यातून आपल्याला होते.                 आपल्या ताटातील उष्टे खाणाऱ्या शिवराम जाधवच्या थोबाडीत मारून पुन्हा काही दिवसांनी त्याला ब...